
शिवाजी महाराजांच्या वादग्रस्त वादग्रस्त विधानावर प्रसाद लाड म्हणाले…
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आपल्या विधानांमुळे चर्चेत आहे. त्यांच्यावर लवकरच कारवाई होण्याची शक्यता आहे. अशातच, आणखी एका नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मासदंर्भात वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. आधीच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल राज्यपालांनी केलेल्या विधानामुळे राज्यात गदारोळ सुरू झाला आहे. यात भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी कोकण महोत्सवाच्या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात झाला आहे असे विधान केले. आमदाराच्या या विधानामुळे राज्यात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडून त्यांच्या वाक्याचा निषेध नोंदवला आहे. अशातच आता प्रसाद लाड यांनी आपल्या वक्तव्यावर दिलगिरी व्यक्त केली आहे.
Live Cricket
Live Share Market


