
उद्धव ठाकरे यांना पक्ष चालविता येत नाही , येणाऱ्या दिवसात चार – पाच लोक दिसतील .
भाजपचे प्रदेशाध्यक्ष . चंद्रशेखर बावनकुळे विदर्भ दौऱ्यावर आहेत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या टीका केली तर . बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेली शिवसेना, त्यांचा दरारा आणि काम बघितलं आहे . उद्धव ठाकरे यांना पक्ष चालविण्याची सवय नाही – घरात बसून जे पक्ष चालवतात ते कोणालाच संपवू शकत नाहीत. घरात बसूनच पक्ष गेला. 2024 पर्यंत उद्धव ठाकरे यांच्या स्टेजवर चार पाचच लोक दिसतील, असा दावाच चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला मोदींच्या नेतृत्वातील इस्रोच्या टीमने चंद्रयान तीन यशस्वी केलं. त्याच प्रमाणे एक ना एक दिवस शरद पवार यांचं मन परिवर्तन होईल. भाजपचे प्रदेशाध्यक्ष . चंद्रशेखर बावनकुळे विदर्भ दौऱ्यावर असून त्यांनी मीडियाशी संवाद साधतांना म्हणाले –

शिवसेना, त्यांचा दरारा आणि त्यांचे काम याचे आम्ही 30 वर्षाचे साक्षी आहोत. इतके लोक सोडून गेले. त्यावेळी काही करू शकले नाही. इथून पुढे जे लोक सोडून जातील त्यांना देखील हे थांबवू शकणार नाहीत. तशी क्षमता उद्धव ठाकरेंकडे नाही. पक्ष चालविण्यासाठी 24 तासातले 18 तास काम करावं लागतं. 2024 पर्यंत उद्धव ठाकरे यांच्या स्टेजवर चार पाचच लोक दिसतील, असा दावाच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.चंद्रशेखर बावनकुळे विदर्भ दौऱ्यावर आहेत. यावेळी ते मीडियाशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचं मन परिवर्तन होणार असल्याचं स्पष्ट केलं. मला अजूनही वाटतं शरद पवार यांचं मन परिवर्तन होईल. मोदींच्या नेतृत्वातील इस्रोच्या टीमने चंद्रयान तीन यशस्वी केलं. त्याचप्रमाणे एक ना एक दिवस शरद पवार यांचं मन परिवर्तन होईल. काळ काही गोष्टींचा निर्णय करत असतो. आम्हाला कधी एकनाथ शिंदे, अजित पवार आमच्या सोबत असतील असं वाटलं नव्हतं. काही काळानंतर माणसाचं मनपरिवर्तन होत असतं, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.



