
पुणे शहराजवळ रेल्वेची मोठी दुर्घटना टळली.
काय घडला प्रकार
आकुर्डी- चिंचवड दळवी नगर पुलाखाली रेल्वे रुळांवर मोठ-मोठे दगड ठेवण्यात आले होते. त्या माध्यमातून रेल्वेचा भीषण अपघात घडवण्याचा प्रयत्न शुक्रवारी झाला. रेल्वे गार्ड संदीप भालेराव यांना हा प्रकार लक्षात आला. त्यानंतर त्यांनी रेल्वे स्टेशन मास्टरांना हा प्रकार सांगितला. तातडीने रेल्वेची सुरक्षा यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली. शुक्रवारी चार ते साडेचार दरम्यान ही घटना घडली. अप लाईन म्हणजे मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या रुळावर हे दगड ठेवण्यात आले होते.
रेल्वेचा अपघात करण्यामागे कोण आहे? याचा शोध पोलीस घेणार आहे. आता रेल्वे इंटेलिजन्स यंत्रणेकडून तपास सुरु केला गेला आहे. तसेच रेल्वे सुरक्षा दल म्हणजे आरपीएफकडून या संदर्भात तपास सुरू केला गेला आहे. या घटनेमागे समाजकंटक आहे की अन्य कोण आहे? याचा शोध तपास यंत्रणेकडून घेतला जाणार आहे.
Live Cricket
Live Share Market



