
दीक्षाभूमी स्मारक समितीमध्ये मनुवादी विचारांच्या लोकांचा कारभार सुरू
नागपूर दीक्षाभूमी – डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी दिलेली जागा ‘बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाला’ देण्यात आली होती. आताच्या दीक्षाभूमी स्मारक समितीमध्ये मनुवादी विचारांच्या लोकांचा कारभार सुरू आहे. त्यामुळं दीक्षाभूमी स्मारक समितीचे अधिकार बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाकडे पुन्हा सुपूर्द करण्यात यावेत. यासाठी आंदोलन करणार असल्याची भूमिका रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी मांडली. ते नागपुरात पत्रकार परिषदेत बोलत होते.रामदास आठवले यांचं नाव न घेता तो राजकारणातील जोकर माणूस आहे. त्यांनी म्हटलं बाबा होतं की, बाबासाहेबांनी इच्छा नसताना बुद्ध धर्म स्वीकारला. अशी टीका आनंदराज आंबेडकरांनी केली.ब्राम्हणांनी पापक्षालन करावं, असं मोहन भागवत यांनी म्हंटलं होतं. यावरून आरएसएस ही फक्त आणि फक्त ब्राम्हणांचं संघटन आहे, हे अप्रत्येक्ष कबूल केलं. त्यांनी हे वक्तव्य यासाठी केलं की, मोठ्या प्रमाणात लोक बुद्ध धर्माकडे वळत आहेत, असंही आनंदराज आंबेडकर म्हणाले.



