मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा

आम्ही त्यांना 40 दिवस दिले.

Manoj Jarange Patil : वळवळ करू नका, आता एक घंटाही वेळ देणार नाही; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारापंढरपूर | 21 ऑक्टोबर 2023 : आरक्षण देण्यासाठी सरकारने आपल्याकडे 30 दिवस मागितले. आम्ही त्यांना 40 दिवस दिले. त्यांना आश्चर्य वाटलं. एवढे दिवस दिलेच कसे? आपण त्यांना मुद्दाम 40 दिवस दिले. कारण त्यांना बहाणा हवा होता. त्यांनी आरक्षण दिलं असतं आणि ते टिकलं नसतं तर तुम्ही वेळ दिला नाही. त्यामुळेच आरक्षण टिकलं नाही असं सांगून आरक्षण न देण्याचा सरकारचा डाव होता. पण आपण त्यांना 30 ऐवजी 40 दिवस दिले आणि त्यांचा डाव उधळून लावला, असं सांगतानाच आता सरकारने वळवळ करू नये. अजून एक दोन दिवस वाढवून मागितलं जाईल. पण एक दोन दिवस तर काय एक घंटाही मिळणार नाही. आरक्षण द्यावंच लागेल, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.
Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close