
रक्तरंजित ट्रेन ,जयपूर-मुंबई एक्सप्रेसमध्ये गोळीबार
आरपीएफचा जवान चेतन सिंह यांनी आरपीएफ जवानासह
चार जणांना ठार केलं. त्यानंतर त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला अटक करण्यात आली आहे. याने जयपूर-मुंबई एक्सप्रेसमध्ये गोळीबार करून आरपीएफ जवानासह चार जणांना ठार केलं. पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलीस त्याची कसून चौकशी करत असून त्याच्याबाबतची नवनवीन माहिती समोर येत आहे. त्याच्या शेजाऱ्यांच्या मते तो अत्यंत शांत होता. कुणाशीही बोलत नव्हता. त्याच्या पत्नीशीही त्याचे कधी भांडण झाले नव्हते. मात्र, डॉक्टरांकडून मिळालेल्या माहितीनुसार त्याला मानसिक आजार असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. चेतन सिंह याला अचानक भास होण्याचा आजार होता. त्याच्यावर उत्तर प्रदेशातील मथुरात उपचार सुरू होते. भास झाल्यावर त्याला राग यायचा. यावेळी तो काहीबाही बरळायचा, असं त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितलं. चेतन सिंहला भास होण्याचा आजार होता. त्यामुळे त्याने या आजाराच्या झटक्यातून तर हा गोळीबार केला



