कन्नमवार ग्रामचा विकास झालेला नाही.

वर्धा जिल्ह्यातील कारंजा तालुक्या मधील कन्नमवार ग्राम 1963 मध्ये स्वर्गीय मारोतराव कन्नमवार हे मुख्यमंत्री झालेत. राष्ट्रीय काँग्रेस पार्टीच्या चिन्हा वर आमदार झाले आणि एक वर्ष मुख्यमंत्री म्हणून काम केलं. कन्नमवार ग्राम कारंजा पंचायत समितीमध्ये येत असून या गावातून पंचायत समिती सदस्य निवडून गेले.या राजकीय बहुल गावाचे क्षेत्रफळ 511.48 हेक्टर क्षेत्र आहे. गट ग्रामपंचायत असून ९ सदस्य आहेत. या ग्रामपंचात मध्ये 770 पुरुष,महिला 550 आहेत 1510 लोकसंख्या असणाऱ्या ग्राम मध्ये पोस्ट ऑफिस,, बँक,तलाठी कार्यालय, शासकीय रुग्णालय,मुलींचे वस्तीगृह, प्राथमिक शाळा व एक छोट्याशा नदीच्या काठी वसलेल्या कन्नमवार ग्राम नगमग्राम मधून रूपांतरित कन्नमवार ग्राम झाले.या गट ग्रामपंचायत मध्ये नांदोरा कन्नमवार हेटी,रायपूर भिवापूर अशी पाच गाव येतात तीन वार्ड असलेल्या ग्रामपंचायत मध्ये सरपंच ईश्वरी प्रवीण यावले आहेत.या आदिवासी बहूल गावात सर्व जाती धर्माचे नागरिक राहतात परंतु आदिवासी कुटुंब जास्त आहेत संख्या जास्त असल्याने शासनाचा निधी या गावात येतो परंतु कन्नमवार गावाचा विकास झालेला नाही.वर्धा जिल्हात दारूबंदी असली तरी हातभट्टी दारू च्या आहरी आदिवासी समुदाय गेलेला आहे.सामान्य नागरिकांच्या सुविधाचा अभाव, कच्ची घरांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे,नाल्यांचे सांडपाण्याची व्यवस्था नाही, नसल्यामुळे हे कन्नमवार ग्राम कन्नमवार ग्राम असे विकासाच्या प्रतीक्षेत आहे
कन्नमवार ग्रामचा विकास झालेला नाही.
लेखक संपादक : कोमल कुमेरिया
Live Cricket
Live Share Market
